HomeCricketरवींद्र जडेजा-अक्षर पटेलचे मजेदार संभाषण, अक्षर- ‘मला तर बॉलिंगच मिळाली नाही...’

रवींद्र जडेजा-अक्षर पटेलचे मजेदार संभाषण, अक्षर- ‘मला तर बॉलिंगच मिळाली नाही…’

रवींद्र जडेजा ने एकूण दहा विकेट घेतल्या आणि भारताला दिल्ली मधील दुसऱ्या कसोटी सामन्यात जिंकण्यासाठी मदत करण्यास महत्वाची भूमिका पार पाडली आहे. डावखुऱ्या फिरकीपटूने कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट ७/४२ धावा केल्या कारण ऑस्ट्रेलिया दुसऱ्या डावात केवळ ११३ धावावर आटोपला. जडेजाचा फिरकी भागीदार रविचंद्रन अश्विनने ५३ धावांत ३ बळी घेतले.

रवींद्र जडेजा ने आता सिरीज मध्ये १७ बळी घेतले आहेत आणि बेट ने ९६ धावा देखील बनवल्या आहेत. त्याने पाच महिन्यांच्या नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पुनरागमन केले आणि खूप महत्वाची भूमिका पार पडली. त्याने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बाद करण्यासाठी विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा आणि स्वीप शॉट्स खेळण्याचा त्याचा निर्धार होता.

तिसऱ्या दिवशी ६१/१ दिवस सुरु केल्या नंतर, ऑस्ट्रेलिया ला ११३ धावांवर संपवण्यात आले, ज्यामध्ये अश्विन आणि जडेजा ने दोघांच्यात विकेट वाटून घेतल्या. ऑस्ट्रेलिया ने त्यांचे शेवटचे सात गडी फक्त २८ धावांवर बाद झाले आणि फक्त ५१ धावा करून बाद झाले.

खेळानंतर अक्षर पटेल ने रवींद्र जडेजा सोबत गमतीशीर संवाद साधताना याचा खुलासा केला आहे कि डावखुरा फिरकीपटू आपल्या सहकाऱ्याच्या विकेटसाठी कसा प्रयत्न करत आहे आणि कर्णधाराला चेंडू देण्यापासून कसे रोखत आहे. अक्षर पटेल ने जडेजा सोबत बोलताना विचारले कि, “सर, माझा गोलंदाजी करण्याचा नंबर येत नाही. अक्षर ला गोलंदाजी द्यायची नाही त्यामुळे अशी गोलंदाजी करत आहेत काय?(सर, काय तुम्ही अशी गोलंदाजी करत आहात कारण अक्षरला गोलंदाजी करण्याची संधी मिळू नये?)

या प्रश्नावर दोघे हसू लागले परंतु नंतर जडेजा ने समजवले कि जेव्हा संघ अशाप्रकारच्या मैदानावर खेळत असतो तेव्हा फिरकीपटू ची भूमिका महत्वाची असते. त्याने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना प्रत्येक बॉल वर स्वीप करताना पाहून गोलंदाजी बदलण्याच्या बद्दल चर्चा केली.

जडेजा ने उत्तर दिले – “तो स्वीप आणि रिवर्स स्वीप खेळायला आवडते. माझा प्रयत्न स्टंप टू स्टंप टाकण्याचा होता. जर तो चुकला आणि बॉल खालीच राहिला तर, बॉल स्टंप वर लागणे योग्य आहे. आज असेच झाले जेव्हा पाच बॉल स्टंप वर लागले.” दुसऱ्या डावामध्ये स्टीव आणि एलेक्स केरी सहित पाच ऑस्ट्रेलियाचे फलंदाज स्वीप शॉट खेळण्याचे शिकार झाले. कैरी ला स्वीप आणि रिवर्स स्वीप खेळण्यामध्ये प्रतिभावान मानले जाते. तिसरा कसोटी सामना धर्मशाळा मधून काढून १ ते ५ मार्च दरम्यान इंदोर मध्ये खेळला जाणार आहे आणि चौथी कसोटी ९ मार्च ते १३ मार्च दरम्यान नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद मध्ये खेळला जाणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts