जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकता. जर तुम्हाला अधिक जोखीम घ्यायची नसेल तर पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये गुंतवणूक करण्याचा चांगला पर्याय आहे. पोस्ट ऑफिस एक सुरक्षित प्लॅटफॉर्म आहे आणि त्या बदल्यात चांगला परतावा देखील मिळतो. पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना ही अशीच एक योजना आहे जी कमी जोखमीसह प्रभावी परतावा देते.
या स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास मॅच्युरिटीच्या वेळी जवळ जवळ ३१ ते ३५ लाख रुपये परतावा मिळवण्यासाठी तुम्हाला १५०० रुपये जमा करावे लागतील. पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना १९ ते ५५ वयोगटातील सर्व भारतीय नागरिकांसाठी खुली आहे. या कार्यक्रमांतर्गत किमान विमा रक्कम १०००० ते १० लाख रुपयांपर्यंत असू शकते.
ही योजना पोस्ट ऑफिसच्या ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजनेंतर्गत चालवली जाते. या योजनेत तुम्ही छोटी गुंतवणूक करून मोठा परतावा मिळवू शकता. या योजनेंतर्गत, तुम्ही दररोज ५० रुपयांची छोटी गुंतवणूक करून म्हणजेच दरमहा रु. १५०० गुंतवून मॅच्युरिटीवर रु. ३५ लाखाचा परतावा मिळवू शकता. ही योजना खास ग्रामीण लोकांसाठी बनवण्यात आली आहे.
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना गुंतवणूकदारांकडून मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर हप्ता स्वीकारते. गुंतवणूकदार प्रीमियम भरण्यासाठी ३० दिवसांच्या वाढीव कालावधीसाठी पात्र आहेत. गुंतवणूकदार पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेचा उपयोग करून पैसे उधार देखील घेऊ शकतात. याशिवाय कार्यक्रमामध्ये नामांकानाच्या तीन वर्षानंतर तुम्ही पॉलिसी रद्द देखील करू शकतात. तथापि गुंतवणूकदारांना यामध्ये काहीच लाभ मिळणार नाही.
या पॉलिसीची मॅच्युरिटी ८० वर्षांपर्यंत असायला हवी. जर एखाद्या गुंतवणूकदाराचा मृत्यू पॉलिसी पूर्ण होण्याच्या अगोदर झाल्यास अशा स्थितीमध्ये कुटुंब किंवा नॉमिनीला डेथ बेनिफिट मिळतो. नॉमिनी पॉलिसी क्लेम करून संपूर्ण रक्कम बोनस सहित प्राप्त करू शकतो.