शेखर कपूरच्या दिग्दर्शनाखाली १९८७ मध्ये बनलेला मिस्टर इंडिया चित्रपट आज देखील दर्शकांच्या फेवरेट चित्रपटांपैकी एक आहे. गेली ३५ वर्षापासून या चित्रपटाची क्रेज जशीच्या तशी आहे. अनिल कपूर आणि श्रीदेवीच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यावेळी सुपरहिरोवर बनलेला हा चित्रपट सुपरहिट झाला होता.
आजच्या युगामध्ये VFX च्या माध्यमातून अॅक्शन क्रियेट करत अनेक सुपरहिरो बेस्ड चित्रपट बनले असतील पण मिस्टर इंडिया चित्रपट त्या काळामधील सर्वात सुपरहिट चित्रपट होता आणि आज देखील दर्शक हा चित्रपट आवडीने पाहतात. इतकेच नाही तर या चित्रपटाने बॉलीवूडला अनेक स्टार्स देखील दिले. तुम्हाला माहिती असेल कि या चित्रपटामध्ये अनिल कपूरसोबत एक मुलांचा घोळका पाहायला मिळाला होता, जो चित्रपटामध्ये श्रीदेवीला खूप त्रास देत होता.
वास्तविक अनिल कपूरच्या घरी श्रीदेवी रेंटवर यामुळे राहायला आली होती कारण तिला शांती हवी होती, तिला घरामध्ये लहान मुले नको होती, जे तिला त्रास देखील आणि अनिल कपूरने तिला खोटे बोलून घरामध्ये ठेवले होते, जेणेकरून त्याला रेंट मिळू शकेल.
चित्रपटामध्ये अनिलने श्रीदेवीला खोटे यामुळे बोलले होते कारण त्याला पैशांची गरज होती. कारण त्याच्यासोबत घरामध्ये राहणारी मुले देखील उपाशी होती, घरामध्ये खाण्यासाठी काहीच नव्हे. अनिल आर्थिक तंगीमधून जात होता. यादरम्यान जेव्हा अनिल कपूरचा खोटारडेपणा पकडला जातो तेव्हा श्रीदेवी खूपच नाराज होते. नंतर जेव्हा तिला सत्य समजते तेव्हा ती त्या मुलांची खूप मदत करते.
आता त्या मुलांबद्दल जाणून घेऊया जे बॉलीवूडमधील स्टार बनले आहेत. यामधील पहिले नाव आहे आफताब शिवदासानी जो बॉलीवूडमध्ये स्टार आहे. ज्याने अनेक चित्रपटांमध्ये काम करून जबरदस्त ओळख बनवली आहे. यामधील दुसरे नाव करण नाथ आहे.
करण आता ३९ वर्षाचा झाला आहे आणि बॉलीवूडमध्ये अजून देखील सक्रीय आहे. करणने २००१ मध्ये आलेल्या पागलपन चित्रपटामधून एक मुख्य अभिनेता म्हणून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. पण त्याला खरी ओळख २००२ मध्ये आलेल्या ये दिल आशिकाना चित्रपटामधून मिळाली.
तिसऱ्या स्टार बद्दल बोलायचे झाले तर त्याचे नाव आहे अहमद खान. हा तोच अहमद खान आहे जो सध्या बॉलीवूडमधील प्रसिद्ध कोरियोग्राफर आहे. अहमद खानने अभिनय केला नाही तर डांसिंगला आपले करियर बनवले आणि आज त्याच्या स्टेप्सवर सारे जग थिरकते.