‘ये काली काली आंखे’ आणि ‘अनदेखी’ सारख्या वेब सिरीज चा भाग असलेली अभिनेत्री आंचल सिंह अलीकडे कामामुळे त्रस्त आहे. १२ वर्षांपासून इंडस्ट्री मध्ये काम केले असून देखील तिला सध्या काम मिळत नाही. अलीकडेच, अभिनेत्रीने एका सोशल मिडियावर पोस्ट टाकून खुलासा केला आहे कि ती मागील ६ महिन्यापासून बेरोजगार आहे. अभिनेत्रीने एक मोठा लेख लिहिला आहे आणि त्याद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आंचल सिंह ने लेखात लिहिले आहे कि, “प्रत्येकजण मला विचारत आहे कि मी पुढे काय करणार आहे, मला कोणत्या कामासाठी नामांकन मिळालेले नाही काय. मला तुम्हा सर्वांना खरे सांगायचे आहे कि २ व्यतिरिक्त मी गेल्या ६ महिन्यांपासून मी कोणत्याही मालिकेमध्ये काम केलेले नाही.
गेल्या ६ महिन्यात कोणत्याही मालिकेतील भूमिकेसाठी ऑडीशनसाठी बोलावले गेले नाही. मी फोन केला असता लोकांनी सांगितले कि, आता कोणतेही काम होत नाही आणि नामनिर्देशन माझ्या हातात नाही. सत्य हे कडवट असते. मी बिन कामाचे घरी बसले आहे. वर्षाची शेवटची वेळ आहे, मी माझ्या कुटुंबात आलो आहे आणि इथे खऱ्या प्रेमाचा आनंद घेत आहे”.
आंचल सिंह ने तिच्या लेखात लिहिले ती धीर धरेल, कारण तिला तब्बू आणि विद्या बालन यांच्या सारखे बनायचे आहे. त्याव्यतिरिक्त आंचल ने बॉलीवूड हंगामा सोबत बोलताना सांगितले कि सत्य इतके धाडसी कधी झाले. तिने सांगितले, “मी लोकांना वास्तवाला सामोरे जात होते कि वेब सिरीज मध्ये प्रशंसा मिळाली म्हणजे तुम्ही यशाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली असे होत नाही. याचा अर्थ तुमच्याकडे क्षमता आहे. पण तुम्हाला स्वतः ला तीन ते चार वर सिद्ध करावे लागेल”.
आंचल ने पुढे सांगितले, “हि थोडी दुखद गोष्ट आहे कि लोकांना या गोष्टीची लाज वाटते कि त्यांना काम मिळत नाही. काम मिळाले नाही तर तुमचा प्रवास कमी महत्वाचा होत नाही आणि तुम्ही देखील कोणापेक्षा कमी होता. हि फक्त तुमची सध्याची स्थिती आहे. मी खूप संघर्षा नंतर काम केले आहे, परंतु काही असे आहेत ज्यांना हुशार असून देखील काम मिळत नाही. म्हणूनच कनेक्ट राहणे आणि एकमेकांच्यावर विश्वास ठेवणे महत्वाचे आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram