जर तुम्ही नोकरी करत एक चांगले आर्थिक नियोजन केले नसेल. अशा परिस्थितीत तुम्हाला निवृत्ती नंतर जीवनात अनेक चढउतार पाहायला मिळू शकतात. अशातच आज आम्ही तुम्हाला एका चांगल्या स्कीम बद्दल सांगणार आहोत. या योजनेचे नाव नेशनल पेन्शन स्कीम आहे. निवृत्तीच्या नंतर जीवनात आर्थिक दृष्ट्या सुरक्षित राहण्यासाठी नेशनल पेन्शन स्कीम एक उत्तम पर्याय आहे.
निवृत्ती नंतर कायम पाहायला मिळते कि अनेक लोक पैशाच्या अभावी त्यांच्या घरातील खर्च देखील भागवू शकत नाहीत. वयाच्या त्या टप्प्यात व्यक्तीजवळ कमावण्याचे कोणते साधन देखील उपलब्ध नसते. अशा परिस्थितीत एनपीएस मध्ये गुंतवलेला पैसा तुमच्या त्या काळामध्ये तुम्हाला आर्थिक दृष्ट्या भक्कम करण्याचे काम करतो.
निवृत्ती नंतरच्या आयुष्याला आर्थिक दृष्ट्या बळकट करण्यासाठी नेशनल पेन्शन स्कीम एक उत्तम पर्याय आहे. आज तुम्ही ही योजना सुरु करून त्या स्कीम मध्ये गुंतवणूकीला सुरुवात करता, तर निवृत्ती नंतर तुम्ही प्रत्येक महिन्याला ५० हजार रुपयांपर्यंत पेन्शन चा फायदा घेऊ शकता.
निवृत्ती नंतर प्रत्येक महिन्याला ५० हजार रुपयांची पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही, तुम्हाला या योजनेत प्रत्येक दिवसाला २०० रुपये गुंतवावे लागतील.
एनपीएस मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला पीपीएफ च्या फिक्स्ड डीपोजीट च्या बदली जास्त परतावा मिळतो. या योजनेचे खास वैशिष्ट्य हे आहे कि यामध्ये गुंतवणुकीतील धोका खूप कमी आहे. एनपीएस मध्ये तुम्ही एक्टीव आणि ऑटो चोईस दोन्ही प्रकारे गुंतवणूक करू शकता.
यामध्ये मैचुरीटी पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदार पूर्ण मुद्दल काढू शकत नाही. तुम्हाला याबद्दल माहित पाहिजे कि नेशनल पेन्शन स्कीम मध्ये चार अस्सेट क्लास असतात. त्यामध्ये इक्विटी, कार्पोरेट डेट, गवर्नमेंट बॉंडस आणि अल्टरनेटीव इन्वेस्टमेंट फंड्स यांचा समावेश आहे.